पीडित असल्याचा कांगावा करू नका   

अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले

वॉशिंग्टन : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताकडून ऑपरेशन सिंदूर  राबविण्यात येत आहे. भारताने  दहशवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले असून, जवळपास १५० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम आणि सैन्य पाकिस्तानचे हल्ले परतवून लावत आहे. त्यावर आता अमेरिकन नेत्या निकी हॅले यांनी पाकिस्तानने पीडित असल्याचा कांगावा करू नये, अशा शब्दांत पाकिस्तानला फटकारले. 
 
निकी हॅले यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दहशतवाद्यांनी हल्ला करुन निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. त्याला प्रत्युत्तर देण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. पाकिस्तानने आता हल्ला पीडित असल्याचा उगाच कांगावा करु नये. दहशतवादी कारवायांना तुम्ही पाठिंबा दिला, म्हणून तुम्हाला कुणी असेच माफ करणार नाही. भारताने जे केले ते योग्यच आहे, अशा शब्दात हॅले यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. 
 
पहलगाम हल्ल्याचा सूड म्हणून भारताने पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. 
या हल्ल्यात फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र तरीही ऑपरेशन सिंदूरदरम्यान नागरिकांना लक्ष्य करण्यात आले, असा कांगावा पाकिस्तानने केला होता. याउलट जागतिक स्तरावर भारताच्या ऑपरेशन सिंदूरला अनेक देशांचा पाठिंबा मिळाला.

Related Articles